google.com, pub-4946049474649373, DIRECT, f08c47fec0942fa0 t Tech Education: July 2024

Monday, July 29, 2024

PM Poshan Menu 2024-25 Update - शासन निर्णयानुसार नवीन निश्चित केलेल्या पाककृती शालेय पोषण आहार वेळापत्रक प्रमाण

 

PM Poshan Menu 2024-25 Update - शासन निर्णयानुसार नवीन निश्चित केलेल्या पाककृती शालेय पोषण आहार वेळापत्रक प्रमाण

प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत (शालेय पोषण आहार योजना) योजनेस पात्र शाळेतील इयत्ता 1 ली ते 8 वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या मध्यान्ह भोजन दिले जाते. सर्व पात्र शाळांना धान्यादी वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी, संदर्भ क्र. 3 अन्वये, सन 2024-25 करीता संचालनालयाकडून नियुक्त पुरवठादार नॅशनल फेडरेशन ऑफ फार्मर्स प्रोक्युरमेंट प्रोसेसिंग अॅन्ड रिटेलिंग को ऑप ऑफ इंडिया लि., नागपूर (NACOF) यांचेमार्फत आवश्यक तांदूळ, भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामातून उचल करुन शाळा स्तरापर्यंत वाहतूक करणे आणि आवश्यक असणा-या धान्यादी मालाचा पुरवठा करुन घेण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे.

प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत संदर्भ क्र. १ शासन निर्णयान्वये, सन २०२४-२५ पासून १५ प्रकारच्या पाककृर्तीच्या स्वरुपात पोषण आहाराचा लाभ देण्यास शासनाने मान्यता दिली आहे. सदर पाककृतीचा तपशिल सोबतचे परिशिष्ठ अ, ब, व क मध्ये देण्यात आलेला आहे.

संदर्भ क्र. २ संचालनालयाकडील पत्रान्वये, तीन संरचीत आहार विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देण्यासाठी "परिशिष्ट-अ नुसार पाककृती प्रमाणे आहार शिजवून दिल्यानंतर शिल्लक राहीलेल्या तांदुळापासुन तांदळाची खीर (परिशिष्ट ब) आणि शिल्लक राहणाऱ्या भाजीपाला / मोड आलेले कडधान्य यांची कोशिंबीर (परिशिष्ट क) अशा प्रमाणे तीन परिशिष्टानुसार विद्यार्थ्यांना दैनंदीन आहार पुरवणे बंधनकारक आहे.

परिशिष्ट- अ" मधील पाककृतीप्रमाणे तांदळाचे प्रमाण इयत्ता १ ली ते ५ वी साठी ८० ग्रॅम व इयत्ता ६ वी ते ८ वी साठी १२० ग्रॅम असे तसेच डाळ / कडधान्य यांचे प्रमाण इ. १ ली ते ५ वी साठी १० ग्रॅम व इ. ६ वी ते ८ वी साठी १५ ग्रॅम. असे याप्रमाणात वापरावयाचे आहेत. पाककृती "परिशिष्ट-ब" मधील तांदुळाची खीर तयार करण्यासाठी वापरावयाचे आहे. तरी उर्वरीत डाळ / कडधान्य इयत्ता १ ली ते ५ वी १० ग्रॅम व इ. ६ वी ते ८ वी साठी १५ ग्रॅम आणि "परिशिष्ट-अ" मधील पाककृती नंतर शिल्ल्क राहीलेला ५० टक्के, भाजीपाला यांचे एकत्रित असे "परिशिष्ट-क" नुसार मोड आलेली कडधान्य (Sprouts) आणि भाजीपाला यांची कोशिंबीर करावयाचे आहे.


महत्वाच्या सुचना

1) सदर, योजनेअंतर्गत तीन संरचीत आहार पध्दतीने पोषण आहाराचा लाभ देणे अनिवार्य आहे.

2) सदरची पाककृती खालील शाळांमध्ये लागू राहील. प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजने अंतर्गत समाविष्ट असलेल्या ग्रामीण भागातील सर्व पात्र शाळा.

नागरी भागातील केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणाली मध्ये समाविष्ट नसलेल्या सर्व पात्र शाळा. केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणाली अंतर्गत समाविष्ट असलेल्या सर्व पात्र शाळा.

3) नागरी भागातील केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीमध्ये समाविष्ठ नसलेल्या शाळा आणि ग्रामीण भागातील शाळा यांनी पाककृती प्रमाणे आवश्यक धान्यादी मालाची व तांदुळाची एकत्रित मागणी माहे ऑगस्ट 2024 व सप्टेंबर 2024 (45) कार्यदिवस) करीता जिल्हयाच्या पुरवठा दाराकडे दि.29/07/2024 पर्यंत नोंदवावी व त्याची एक प्रत जिल्हास्तरीय कार्यालयास सादर करण्यात यावी. 4) केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीमध्ये समाविष्ठ असलेल्या सर्व पात्र शाळांकरिता माहे ऑगस्ट 2024 व सप्टेंबर 2024 (45) कार्यदिवस) करीता अनुज्ञेय तांदुळाची एकत्रित मागणी दि.29/07/2024 पर्यंत जिल्हायाच्या पुरवठादाराकडे नोंदवावी व त्याची एक प्रत जिल्हास्तरीय कार्यालयास सादर करण्यात यावी

5) मा. शिक्षण संचालक (प्राथमिक) शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे व नॅशनल फेडरेशन ऑफ फार्मर्स प्रोक्युरमेंट प्रोसेसिंग अॅन्ड रिटेलिंग को ऑप ऑफ इंडिया लि., (NACOF) यांचा झालेला करारनामा दि.१५/०३/२०२४ मधील मुदा क्र. २६ नुसार पुरवठादाराने मालाचा पुरवठा केल्यानंतर त्याचे यादृच्छिक (Random) पध्दतीने १) मुळशी २) जुन्नर ३) मावळ या ०३ तालुक्यातील शाळांमधील धान्यादी मालाचे नमुने गटशिक्षणाधिकारी / अधिक्षक वर्ग २ (पीएम-पोषण) या अधिकाऱ्यांकडुन शासकीय प्रयोगशाळेत तपासणी साठी पाठविणेत यावेत.

6) सुधारीत पाककृतीनुसार दोन आठवडेसाठी प्रत्येक दिवशी एक याप्रमाणे सोबत जोडलेल्या "परिशिष्ट-अ नुसार एकुण 1 ते 12 पाककृती वेगवेगळ्या दिवसांसाठी निश्चित करण्यात आलेल्या आहेत. सदर प्रत्येक दिवस ठरवून दिलेल्या पाककृतीप्रमाणेच आहार पुरविण्यात यावा. उपरोक्त नमूद पाककृतीप्रमाणे आहार दिल्यानंतर शिल्लक राहिलेल्या तांदळापासुन तांदळाची खीर आठवडयातील चार दिवस (सोमवार, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार) "परिशिष्ट-ब" प्रमाणे देणे बंधनकारक राहील.

8) पहिल्या आठवड्यातील बुधवार व दुस-या आठवड्यातील बुधवार या दिवशी अंडा पुलाव याचा लाभ देण्याचे निश्चित झालेले आहे. जे विद्यार्थी अंडी पुलाव खाणार नाही त्यांना "परिशिष्ट- अ" मधील पाककृती 1 प्रमाणे व्हेजीटेबल पुलाव दयावयाचा आहे. तसेच अंडी न खाणा-या विद्यार्थ्यांना शासनाने निश्चित केलेल्या दर मर्यादेत केळी अथवा स्थानिक फळ देण्यात यावे. सदर दिवशी तांदूळाची खीर, नाचणीचे सत्व व मो आलेले कडधान्य (Sprouts) देण्यात येऊ नयेत, 

आठवडयातील एक दिवस (दर शनिवार) "परिशिष्ट-ब" प्रमाणे नाचणीसत्व देणे बंधनकारक राहील, 10) प्रत्येक आठवडयात (बुधवार वगळून) प्रत्येक दिवशी विद्यार्थ्यांना मोड आलेले कडधान्य (Sprouts) "परिशिष्ट-क" प्रमाणे देण्यात यावी. सदर कडधान्य (Sprouts) तयार करण्यासाठी दैनंदीन पाककृतीमधील कडधान्यामधुन 50 टक्के बचत करुन त्याचा वापर करावयाचा आहे तसेच सदर कडधान्य (Sprouts) मध्ये दैनंदीन पाककृतीमध्ये आवश्यक प्रमाणे भाजीपाला वापर करण्यात यावा (शासन निर्णय दिनांक 02/02/2011 अन्वये पाककृतीसाठी इयत्ता 1 ली ते 5 वी करीता 50 ग्रॅम भाजीपाला व इयत्ता 6 वी ते 8 वी करीता 75 ग्रॅम भाजीपाला वापरणे बंधरकारक आहे. 11) अंडी, सोयाबीन वडी, गुळ/ साखर, दुध पावडर इत्यादी साठी लागणारा आहार खर्चाव्यतिरीक्तचा अधिकचा निधी राज्यस्तरावरुन पुरवण्यात येईल. नाचणीसत्वासाठी आवश्यक नाचणीचा पुरवठा भारतीय अन्न महामंडळाकडुन करण्यात येणार आहे.

12) शाळा स्तरावर सर्व मुख्याध्यापक यांनी स्वयंपाकी तथा मदतनीस यांना संदर्भ क्र 1 मधील शासन निर्णयातील सर्व बाबी जसे की, तीन संरचीत आहार पध्दती, पाककृती शिजवून तयार करण्याचा सविस्तर घेवून विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देण्याबाबत कार्यवाही करावी.

तपशील इत्यादी समजावून सांगून शासन निर्णयातील सर्व बाबींचे तंतोतंत अनुपालन होईल याची दक्षता घ्यावी.

13 ) हरभऱ्याचे मोड विद्यार्थ्यांना देण्यापुर्वी ते वाफवून विद्यार्थ्यांना वाटप करण्यात यावे.

निश्चित करण्यात आलेली पाककृती खालीलप्रमाणे :-



सदर सर्व बाबींचा विचार करुन विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात वैविध्यता आणून विद्यार्थ्यांना तीन संरचित आहार (Three Course Meal) दिल्यास विद्यार्थी शालेय पोषण आहार आवडीने खातील. तीन संरचित पध्दतीमध्ये तांदूळ, डाळी/कडधान्यापासून तयार केलेला आहार मोड आलेले कडधान्य (स्प्राउट्स) आणि गोड पदार्थ म्हणून तांदळाची खीर/नाचणीसत्व यांचा समावेश करुन नविन पाककृती शासनाने संदर्भिय शासन निर्णयान्वये निश्चित केली आहे.

१) प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून पाककृती सुधारणा समितीने सुचविलेल्या १५ प्रकारच्या पाककृतींच्या स्वरुपात पोषण आहाराचा लाभ देण्यास शासनाने संदर्भिय शासन निर्णयान्वये मान्यता दिलेली आहे.

२) केंद्रीय स्वयंपाकगृहांतर्गत येणाऱ्या शाळा वगळून उर्वरित सर्व शाळास्तरावर सद्यस्थितीत ज्या डाळी व कडधान्य उपलब्ध आहेत. त्या डाळी व कडधान्यापासून उक्त शासन निर्णयामध्ये दिलेल्या परिशिष्टात नमूद असलेल्या पाककृतींनुसार विद्यार्थ्यांना योजनेचा तात्काळ लाभ देण्यात यावा.

३) तांदुळ व धान्यादी मालाची यापुढील मागणी नोंदविताना संदर्भिय शासन निर्णयाचे पालन होईल यादृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करुन यापुढील मागणी नोंदविण्यात यावी. 

४) आपल्या कार्यक्षेत्रातील केंद्रीय स्वयंपाकगृहांतर्गत येणाऱ्या सर्व शाळांतील विद्यार्थ्यांना संदर्भिय शासन निर्णयानुसार तात्काळ मध्यान्ह भोजनाचा लाभ देण्यात यावा. याबाबत हलगर्जीपणा होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी.

५) तीन संरचित आहार पध्दतीप्रमाणे विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देणे अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांना प्रत्येक दिवशी (अंडा पुलाव पाककृती असलेला दिवस वगळून) आहारासोबत मोड आलेले कडधान्य (स्प्राऊटस) व तांदळाची खीर/नाचणी सत्व देण्यात यावेत.

६) ज्या दिवशी विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकदा अंडा पुलाव (पाककृती क्र.९) या पदार्थाचा लाभ विद्यार्थ्यांना देणार आहे. त्या दिवशी इ. १ ली ते ५ वी करीता १०० ग्रॅम तांदूळ व इ. ६ वी ते ८ वी करीता १५० ग्रॅम तांदूळाचा वापर करुन मध्यान्ह भोजनचा लाभ देण्यात यावा. अंडी न खाणाऱ्या विद्यार्थ्यांना सदर दिवशी व्हेजिटेबल पुलाव या पाककृतीच्या स्वरुपात लाभ देण्यात यावा. तसेच, अंडी न खाणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाने निश्चित केलेल्या खर्च मर्यादेत केळी अथवा स्थानिक फळ देण्यात यावेत, सदर दिवशी तांदळाची खीर, नाचणीसत्व व मोड असलेले कडधान्य (स्प्राऊट्स) देण्यात येऊ नये.

७) गोड खिचडी, नाचणी सत्व व तांदळाच्या खीरीच्या पाककृतीसाठी दुध पावडर, गुळ/साखर व सोयाबीन पुलावासाठी सोयाबीन वडी यांची आवश्यकता आहे. सदर वस्तू पुरवठेदारामार्फत पुरविण्यात येत नसल्यामुळे प्रस्तुत वस्तूंच्या खरेदीसाठी महिन्यातील दोन दिवसांच्या आहार खर्चाची पूर्ण रक्कम शाळा स्तरावर वितरीत करावयाची आहे. त्या रक्कमेतून शालेय व्यवस्थापन समितीने दुध पावडर, गुळ/साखर, सोयाबीन वडी यांची खरेदी करुन विद्यार्थ्यांना लाभ देण्यात यावा.

७.१ केंद्रीय स्वयंपाकगृहांतर्गत येणाऱ्या शाळा वगळून उर्वरित सर्व शाळांतील विद्यार्थ्यांना सदर शासन निर्णयानुसार लाभ देण्यासाठी उक्त पदार्थांच्या खरेदी करीता आवश्यक निधी शाळास्तरावर वर्ग करण्यासाठी आपल्या कार्यक्षेत्रातील इ. १ ली ते ५ वी व इयत्ता ०६ वी ते ०८ वी च्या विद्यार्थ्यांच्या दिनांक ०१/०७/२०२४ रोजीच्या पटसंख्येचा तपशिल दिनांक ०२/०७/२०२४ रोजी सकाळी ११:०० वाजेपर्यंत संचालनालयास सादर करण्यात यावा, विहित कालमर्यादेत माहिती सादर न झाल्यास होणाऱ्या विलंबास सर्वस्वी आपण जबाबदार राहाल. याची गांभीर्याने नोंद घ्यावी.

८) नाचणी सत्वासाठी आवश्यक नाचणीची मागणी केंद्र शासनाकडे करण्यात आली आहे. भारतीय अन्न महामंडळातून प्रस्तुत नाचणीचा पुरवठा शासनामार्फत शाळास्तरावर करण्यात येईल.

९) शासन निर्णयामध्ये दिलेल्या निर्देशांनुसार आपल्या स्तरावरुन आवश्यक ती कार्यवाही करुन विद्यार्थ्यांना तात्काळ योजनेचा लाभ देण्यात यावा.

१०) योजनेंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना दोन आठवडे प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या पदार्थाचा लाभ देण्याच्या दृष्टीने पाककृती निर्धारित करण्यात आलेल्या आहेत. आठवड्यातील प्रत्येक दिवशी कोणती पाककृती निश्चित करावयाची याबाबत संबंधित जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखालील समितीव्दारे तात्काळ निर्णय घेण्यात यावा. तसेच, मुंबई महानगरपालिका क्षेत्राकरीता शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या अध्यक्षतेखालील समितीने तात्काळ निर्णय घ्यावा, प्रस्तुत समितीने घेतलेल्या निर्णयानुसारच विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यात यावा.

योजनेंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना तीन संरचित आहार (Three Course Meal) चा लाभ देणेकरीता आपल्या स्तरावरुन शासन निर्णयानुसार तात्काळ कार्यवाही करण्यात यावी. याबाबत हलगर्जीपणा होणार नाही याची दक्षता आपल्या स्तरावरुन घेण्यात यावी.

परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

Download



Friday, July 26, 2024

राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांकरिता 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा-२' हे अभियान राबविणेबाबत.

 
राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांकरिता 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा-२' हे अभियान राबविणेबाबत.

राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांकरिता 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा-२' हे अभियान राबविणेबाबत.




महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांकः मुमंअ २०२४/प्र.क्र.५२/एसडी-६ मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक मंत्रालय, मुंबई ४०० ०३२


दिनांक:- २६ जुलै, २०२४


वाचाः- शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्र. मुमंअ-२०२३/प्र.क्र.११४/एसडी-६, दि.३०.११.२०२३


प्रस्तावना :-


संदर्भाधीन शासन निर्णयान्वये सन २०२३-२४ मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अनोखे स्पर्धात्मक अभियान राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांकरीता दि.०१.०१.२०२४ ते दि.१५.०२.२०२४ या कालावधीत राबविण्यात आले. या अभियानास विद्यार्थी व शिक्षकांबरोबरच माजी विद्यार्थी, पालक व शिक्षणप्रेमी नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. जवळपास ९५% शाळांमधील सुमारे २ कोटी विद्यार्थी या अभियानांतर्गत विविध उपक्रमात सहभागी झाले होते. त्यामुळे हे अभियान मोठ्या प्रमाणावर यशस्वी ठरले. या अभियानातील काही उपक्रमांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये देखील झाली आहे.


या अभियानात तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर यशस्वी ठरलेल्या शाळांना रोख रकमेच्या स्वरुपात पारितोषिके देण्यात आली व या रकमेचा विनियोग शाळांच्या गरजेनुसार करण्याची मुभा देखील शाळा व्यवस्थापनास देण्यात आली. त्यामुळे या शाळांना तातडीच्या गरजा भागविण्याकरीता निधी उपलब्ध झाला. अर्थात या भौतिक फायद्यापेक्षा विद्यार्थ्यामध्ये तसेच शिक्षकांमध्ये एक प्रकारचे नवचैत्यन निर्माण होऊन अनेक सकारात्मक बदल निदर्शनास आले ही बाब अधिक महत्वाची आहे. विविध प्रकरचे चाकोरीबाहेरील स्पर्धात्मक उपक्रम राबवून विद्यार्थ्यामध्ये स्पर्धात्मक वृत्ती निर्माण होऊन त्यांच्या व्यक्तिमत्व विकासास चालना मिळावी व त्यांना खऱ्या अर्थाने बाह्य जगाची ओळख व्हावी हा या अभियानाचा मूळ हेतू होता व तो मोठ्या प्रमाणावर साध्य करता आला.


उपरोक्त सर्व बाबी विचारात घेता सन २०२४-२५ देखील मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा-टप्पा २ हे स्पर्धात्मक अभियान काही नवनवीन उपक्रमांसह राबविण्याबाबतचा प्रस्ताव शासनच्या विचाराधीन होता.


शासन निर्णयः-


१. अभियानाची व्याप्ती-:


i) राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांनी सदर अभियानात सहभागी होणे अपेक्षित आहे.

ii) या अभियानासाठी शाळांची विभागणी अ) शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व ब) उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा अशा दोन वर्गवारीत करण्यात येत आहे. याचा अर्थ प्राथमिक स्तरापासून राज्य स्तरापर्यंत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनाच्या शाळांशी स्पर्धा करणार नाहीत. प्रत्येक स्तरावरील विजेता या दोन्ही वर्गवारीसाठी स्वतंत्रपणे निवडण्यात येईल.


सदर अभियान अ) बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्र ब) वर्ग अ व वर्ग ब च्या महानगरपालिकांचे कार्यक्षेत्र तसेच क) उर्वरित महाराष्ट्र अशा स्तरांवर खालीलप्रमाणे राबविण्यात येईल.

शासन निर्णय क्रमांकः मुर्मअ २०२४/प्र.क्र.५२/एसडी-६


२. अभियानाची उद्दिष्टे :-


1) शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण, क्रीडा इत्यादी घटकांबाबत जागृती करून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासास चालना देणे.


ii) शासनाच्या ध्येय धोरणाशी सुसंगत अशा शालेय प्रशासनाच्या बळकटीकरणास चालना देणे.


iii) शालेय शिक्षणाच्या दृष्टीकोनातून सर्वाधिक महत्वपूर्ण असलेल्या शैक्षणिक संपादणूक या घटकाच्या वृद्धीस प्रोत्साहन देणे.


३. अभियानाचा कालावधीः-


i) दि. २९ जुलै ते दि.०४ ऑगस्ट, २०२४ हा कालावधी अभियानाच्या पूर्व तयारीसाठी असेल या कालावधीत अभियानाची माहिती राज्यातील सर्व शाळांमध्ये पोहोचेल याची दक्षता आयुक्त (शिक्षण) यांच्या मार्गदर्शनानुसार विभागाच्या अधिकाधिक क्षेत्रीय कार्यालयांनी घ्यावी. सर्व शाळांनी या अभियानात सहभागी होण्यासाठी नोंदणी करावी याबाबत सर्वतोपरी प्रयत्न या कालावधीत करण्यात यावेत.


ii) दि.५ ऑगस्ट २०२४ रोजी औपचारिक कार्यक्रमाद्वारे अभियानाची सुरुवात होईल व हे अभियान एक महिना कालावधीसाठी असेल दि.०४ सप्टेंबर २०२४ रोजी अभियानाचा कालावधी पूर्ण होईल.


दि.०५ सप्टेंबर २०२४ ते दि.१५ सप्टेंबर २०२४ या कालावधीत मूल्यांकनाची प्रक्रिया पार पाडण्यात यावी.


iv) त्यानंतरच्या सुयोग्य दिनांकास या अभियानाचा राज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होईल.


४. अभियानाचे स्वरूपः-


४.१ अभियानात सहभागी होऊन एकमेकांशी स्पर्धा करणाऱ्या शाळांना खालीलप्रमाणे


गुणांकन देण्यात येईल.


अ) पायाभूत सुविधा ३३ गुण


ब) शासन ध्येय धोरण अंमलबजावणी ७४ गुण


क) शैक्षणिक संपादणूक - ४३ गुण


खर्च विवरण -

अ.क्र. १ येथील खर्चासाठी केंद्रस्तर, तालुकास्तर, जिल्हास्तर, विभागस्तर, महानगरपालिका क्षेत्र स्तर तसेच राज्यस्तर यासाठी खर्चाची मर्यादा निश्चित करण्याचे अधिकार आयुक्त (शिक्षण) यांना असतील.


उपरोक्त तक्त्यातील अ.क्र. १ व २ येथील खर्चाच्या रकमामध्ये आवश्यकतेनुसार बदल करण्याचे अधिकार आयुक्त (शिक्षण) यांना असतील.


खर्चाची रकम संबंधितांना प्रदान करण्याची कार्यपध्दती निश्चित करण्याचे अधिकार देखील आयुक्त (शिक्षण) यांना असतील.


अभियानाचा एकूण अपेक्षित खर्च (I)+(II)+(III)+(IV)+(V) = रु.८६७२.०० लक्ष


४.५ स्तरनिहाय व वर्गवारीनिहाय प्रत्यक्ष स्पर्धा :-


४.५.१ बृहन्मुंबई महानगरपालिका स्तरावरील :-


बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत १९ युआरसी (तालुका दर्जा) मधील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेस युआरसी निहाय पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाकरिता अनुक्रमे रु.३.०० लक्ष, रु.२.०० लक्ष व रु.१.०० लक्ष इतक्या रकमेचे पारितोषिक अनुज्ञेय असेल. अशाच प्रकारचे पारितोषिक इतर व्यवस्थापनांच्या शाळांना अनुज्ञेय असेल


बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत दोन जिल्ह्यामधील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेस जिल्हा निहाय पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाकरिता अनुक्रमे रु.११.०० लक्ष, रु.५.०० लक्ष व रु.३.०० लक्ष इतक्या रकमेचे पारितोषिक अनुज्ञेय असेल. अशाच प्रकारचे पारितोषिक इतर व्यवस्थापनांच्या शाळांना अनुज्ञेय असेल


मनपास्तरावर शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेस पहिल्या, दुसऱ्या व


तिसऱ्या क्रमांकाकरिता अनुक्रमे रु. २१.०० लक्ष, रु.१५.०० लक्ष व रु.११.०० लक्ष इतक्या रकमेचे पारितोषिक अनुज्ञेय असेल. अशाच प्रकारचे पारितोषिक इतर व्यवस्थापनांच्या शाळांना अनुज्ञेय असेल


४.५.२ वर्ग अ व वर्ग ब च्या महानगरपालिकांचे कार्यक्षेत्र :-


वर्ग अ व वर्ग ब महानगरपालिका अंतर्गत १६ युआरसी (तालुका दर्जा) मधील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेस युआरसी निहाय पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाकरिता अनुक्रमे रु.३.०० लक्ष, रु.२.०० लक्ष व रु.१.०० लक्ष इतक्या रकमेचे पारितोषिक अनुज्ञेय असेल. अशाच प्रकारचे पारितोषिक इतर व्यवस्थापनांच्या शाळांना स्वराज्य संस्थांच्या शाळेस जिल्हा निहाय पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाकरिता अनुक्रमे रु११.०० लक्ष, रु.५.०० लक्ष व रु. ३.०० लक्ष इतक्या रकमेचे पारितोषिक अनुज्ञेय असेल. अशाच प्रकारचे पारितोषिक इतर व्यवस्थापनांच्या शाळांना अनुज्ञेय असेल


मनपास्तरावर शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेस पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाकरिता अनुक्रमे रु. २१.०० लक्ष, रु.१५.०० लक्ष व रु.११.०० लक्ष इतक्या रकमेचे पारितोषिक अनुज्ञेय असेल. अशाच प्रकारचे पारितोषिक इतर व्यवस्थापनांच्या शाळांना अनुज्ञेय असेल


४.५.३ उर्वरित महाराष्ट्र कार्यक्षेत्र :-


तालुकास्तरावरील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाच्या शाळेस अनुक्रमे रु.३.०० लक्ष, रु.२.०० लक्ष व रु.१.०० लक्ष इतक्या रकमेचे पारितोषिक अनुज्ञेय असेल. अशाच प्रकारचे पारितोषिक इतर व्यवस्थापनांच्या शाळांना अनुज्ञेय असेल


जिल्हास्तरावरील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाच्या शाळेस अनुक्रमे रु.११.०० लक्ष, रु.५.०० लक्ष व रु.३.०० लक्ष इतक्या रकमेचे पारितोषिक अनुज्ञेय असेल. अशाच प्रकारचे पारितोषिक इतर व्यवस्थापनांच्या शाळांना अनुज्ञेय असेल


विभागस्तरावरील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाच्या शाळेस अनुक्रमे रु. २१.०० लक्ष, रु.१५.०० लक्ष व रु.११.०० लक्ष इतक्या रकमेचे पारितोषिक अनुज्ञेय असेल. अशाच प्रकारचे पारितोषिक इतर व्यवस्थापनांच्या शाळांना अनुज्ञेय असेल.


४.५.४ राज्य स्तरावरील स्पर्धा :-


बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील प्रथम क्रमांकाची शाळा, अ व ब वर्ग महानगरपालिका कार्यक्षेत्रातील प्रथम क्रमांकाची शाळा तसेच उर्वरित महाराष्ट्रातील प्रत्येक विभागातील प्रथम क्रमांकाच्या शाळा या राज्यस्तरावर एकमेकांशी स्पर्धा करतील. या स्पर्धेतून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी निवडलेल्या शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना अनुक्रमे रु.५१.०० लक्ष, ३१.०० लक्ष व २१.०० लक्ष इतक्या रकमेचे पारितोषिक अनुज्ञेय असेल. अशाच प्रकारचे पारितोषिक इतर व्यवस्थापनांच्या शाळांना अनुज्ञेय असेल.


४.६ जिंकलेल्या पारितोषिकाच्या रकमेचा विनियोग :-


कोणत्याही स्तरावर जिंकलेल्या पारितोषिकाच्या रकमेचा विनियोग करण्याचा अधिकार शाळांच्या गरजांचा प्राधान्यक्रम विचारात घेऊन संबंधित शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीस असेल.


५. पारितोषिकाच्या रकमेसह अभियानासाठी एकूण खर्च अंदाजे रु.८६.७२ कोटी इतक्या खर्चास शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे.

सदर अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय कार्यकारी समिती गठीत करण्यात आली आहे. अभियानाचा प्रचार व प्रसार तसेच अंमलबजावणी यासाठी आवश्यक ती उपाययोजना करणे सदर समितीची जबाबदारी असेल. यासाठी रु.१२.९० कोटी इतका निधी आयुक्त (शिक्षण) यांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. सदर निधी विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून खर्च करण्यास ते सक्षम असतील.


७. या प्रीत्यर्थ होणारा खर्च मागणी क्रमांकई-०२, २२०२, सर्वसाधारण शिक्षण, ०१, प्राथमिक शिक्षण, १०१, शासकीय प्राथमिक शिक्षण, (००) (०१) राज्यात आदर्श शाळा विकसित करणे (कार्यक्रम) (२२०२ जे ०७२) ५०-इतर खर्च या लेखाशीर्षाखालील सन २०२४-२५ या चालू वित्तीय वर्षाच्या मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा. यासाठी आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांना नियंत्रक अधिकारी व लेखाधिकारी, प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे.


८. सदर शासन निर्णय वित्तीय अधिकार नियमपुस्तिका १९७८, भाग-पहिला, उपविभाग भाग-३, अनुक्रमांक ४ मधील परिच्छेद क्रमांक २७ (२) (ब) अन्वये प्रशासनिक विभागांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार तथा शासनाच्या मान्यतेने निर्गमित करण्यात येत आहे.


९. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४०७२६१६४५१२१९२१ असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून निर्गमित करण्यात येत आहे.


महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

Download 


Thursday, July 25, 2024

PM-Poshan Update - शाळांमध्ये परसबाग उपक्रम राबविण्याकरीता मार्गदर्शक सूचना शासन आदेश

 

PM-Poshan Update - शाळांमध्ये परसबाग उपक्रम राबविण्याकरीता मार्गदर्शक सूचना शासन आदेश 

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत शाळांमध्ये परसबाग उपक्रम राबविण्याकरीता मार्गदर्शक सूचना. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग दिनांक: २५ जुलै, २०२४.




१)शाळांमध्ये परसबागांबाबत (School Nutrition Gardens) केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना दि.१५ ऑक्टोंबर, २०१९.

२) प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेबाबत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना दि.२१ डिसेंबर, २०२२. 

३) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. शापोआ-२०१८/प्र.क्र.१७१/एस.डी.३. दि.११ जुलै, २०२३.

४) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. शापोआ-२०१८/प्र.क्र.१७१/एस.डी.३ दि.०५ सप्टेंबर, २०२३.

५) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. शापोआ.क्र.प्र/२०१८-१.डी.एस/७१३. दि. २७ फेब्रुवारी, २०२४.


केंद्र शासनाने प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत शाळांमध्ये परसबागा निर्माण करुन सदर परसबागांमधून उत्पादित भाजीपाला व इतर पदार्थांचा समावेश शालेय पोषण आहारामध्ये करण्याचे निर्देश दि. १५ ऑक्टोबर, २०१९ रोजीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दिले आहेत. त्यानुषंगाने राज्यामध्ये प्रस्तुत उपक्रम ग्रामीण व शहरी भागातील सर्व पात्र शाळांमध्ये राबविण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच, परसबाग उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी विभागामार्फत उत्कृष्ट परसबाग स्पर्धा आयोजित करण्यात येतात. विद्यार्थ्यांनी परसबागेत पिकवलेला भाजीपाला, फळे इत्यादींचा शालेय पोषण आहारात समाविष्ट करुन विद्यार्थ्यांना देण्यात येत आहेत. परसबाग निर्मितीमुळे विद्यार्थ्यांची निसर्गाशी जवळीक निर्माण व्हावी, पोषक आहार मिळावा, कुपोषण दूर व्हावे, असे विविध चांगले हेतू या उपक्रमामुळे साध्य होत आहेत.

प्रस्तुत योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या आहारामध्ये स्थानिक उपलब्ध अन्नधान्य, तृणधान्य व अन्य पदार्थांचा समावेश करुन आहाराचा दर्जा व पौष्टिकता वृध्दीगत करण्याच्या दृष्टीने तज्ज्ञ व्यक्तींची समिती शासन निर्णय दि.१५ मार्च, २०२३ अन्वये गठीत करण्यात आली होती. त्यानुषंगाने विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात वैविध्यता आणण्यासाठी विद्यार्थ्यांना तीन संरचित आहार (Three Course Meal) पध्दतीनुसार (तांदूळ, डाळी / कडधान्यापासून तयार केलेला आहार, मोड आलेले कडधान्य (स्प्राऊटस) व गोड पदार्थ म्हणून तांदळाची खीर व नाचणीसत्य) आहार देण्याचा निर्णय दि.११ जून, २०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये घेण्यात आला आहे. तीन संरचित आहार पध्दतीमध्ये मोड आलेल्या कडधान्य (स्प्राऊट्स) या पाककृतीमध्ये परसबागेतील उत्पादित कांदा, टोमॅटो, कोबी, लिंबू इ. बाबींचा समावेश करणे अपेक्षित आहे. त्यानुषंगाने राज्यातील सर्व पात्र शाळांमध्ये परसबागा निर्माण करण्यासाठी तसेच परसबागेचे महत्व अधोरेखित करण्यासाठी मार्गदर्शक सूचना देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.


केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे राज्यातील योजनेस पात्र शाळांमध्ये परसबागा निर्माण करुन सदर परसबागांमधून उत्पादित ताजा भाजीपाला इ. पदार्थांचा वापर शालेय पोषण आहारामध्ये करण्यात यावा.

२) राज्यातील शाळांमध्ये परसबागा निर्माण करण्याकरीता मार्गदर्शक सूचना सोबत जोडलेल्या परिशिष्ट प्रमाणे राहतील.


प्रस्तुत शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेताक २०२४०७२५१४५३४०४३२१ असा आहे. सदर परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,


(प्रमोद पाटील)

 अवर सचिव, महाराष्ट्र शासन


यांची लागवड करुन तयार केलेल्या बागेस शालेय परसबाग असे संबोधतात.


१. शालेय परसबाग संकल्पनेची वैशिष्ट्ये :

1. मर्यादित जागेचा वापरः शाळेमध्ये परसबागेची निर्मिती कुठेही केली जावू शकते. परसबागेसाठी मोकळ्या जागेचा मोठ्या भूखंडाची आवश्यकता नाही. आरोग्यदायी भाज्यांची लागवड कुंडी, कंटेनर यामध्येही करता येते. तसेच, सदर लागवड शाळेच्या गच्चीवर, छतावर किंवा शाळेच्या प्रवेशद्वारावरही करता येते. वेलवर्गीय वाणांची लागवड कुंडीत केल्यास सदर वेल भिंतीवर रेंगाळतात आणि त्यांना जमिनीची गरज नसते. मर्यादित जागेचा महत्तम वापर कसा करता येतो ही बाब परसबाग निर्मितीमधून विद्यार्थ्यांना शिकवली जावू शकते.

ii. भाजीपाल्यामधील वैविधताः परसबागेमध्ये विविध प्रकारच्या भाजीपाल्याची व फळांचे उत्पादन घेणे शक्य आहे. काही अपवाद वगळता, भाज्या किंवा फळांचा प्रत्येक भाग खाऊ शकतो. देशाच्या अनेक भागांमध्ये भाज्यांचे वेगवेगळे भाग जसे की फुले, पाने आणि देठ हे सर्व खाल्ले जातात. उदा. केळीच्या फुलांचा काही पाककृतींमध्ये समाविष्ट केले जाते, तर पपईची पाने त्यांच्या औषधी गुणधर्मांमुळे प्रसिद्ध आहेत. अशाप्रकारे भाजीपाल्याची वैविधता विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यास परसबागेची मदत होते.

iii. नाविन्यतेस चालना:- विद्यार्थ्यांना चौकटीबाहेर विचार करायला आणि मार्ग शोधायला परसबाग फायदेशीर ठरते. शाळेत परसबाग निर्मिती न करण्यासाठी शाळेत जागेची व पाण्याची असणारी कमतरता, आवश्यक संसाधने उपलब्ध नसणे इत्यादी कारणे असू शकतात. मुलांना सदर अडचणीवर मात करुन परसबाग निर्मितीस चालना दिल्यास त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांना चालना मिळेल. स्थानिक परिस्थिती, जमीन आणि हवामानाला अनुकूल असलेल्या स्थानिक प्रजाती ओळखून त्याची लागवड करणे आणि ठिबक सिंचनाच्या सोप्या पद्धतीद्वारे बागेत पाणी देण्याचे विविध मार्ग विद्यार्थी शोधू शकतात. स्थानिक तज्ञ आणि शेतकऱ्यांनी त्यांचे कौशल्य विद्यार्थ्यांना सांगितल्यास विद्यार्थी नाविन्यपूर्ण उपाय शोधण्यावर भर देतील.

iv. ज्ञानाचा उपयोग समाजासाठी:- विद्यार्थ्यांना परसबागेसंदर्भात शाळेमध्ये प्राप्त ज्ञानाच्या आधारे त्यांना त्यांच्या स्वतःच्या घराच्या परिसरात परसबाग सुरू करण्यास प्रवृत्त केले जावू शकते. शाळांमध्ये परसबाग निर्मिती करण्यामागचा उद्देश विद्यार्थ्यांना कौशल्याधारित ज्ञान देणे आणि शाळेत शिकलेल्या ज्ञानाचा वापर करून उपलब्ध साधनसामुग्रीत घरच्या परिसरात परसबाग सुरू करण्यास प्रोत्साहित करणे हा आहे.

v. लोकसहभागः- ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागातील सर्व शाळांमध्ये शालेय परसबाग विकसित करण्यासाठी शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि स्थानिक रहिवासी यांचा सहभाग आवश्यक आहे. तांत्रिक सहाय्य, प्रशिक्षण, बियाणे, रोपे, सेंद्रिय खत इत्यादीची तरतूद विविध विभाग/संस्था जसे की कृषी विज्ञान केंद्रे, कृषी विभाग, राज्य कृषी विद्यापीठे, वन विभाग इ. यांच्याशी समन्वय साधून प्राप्त करुन घेता येतो. मनरेगा अंतर्गत संरक्षण सीमा बांधणे, जमिनीचे सपाटीकरण इत्यादी उपक्रम हाती घेतले जाऊ शकतात.

vi. निसर्गाशी जवळीक:- शाळेच्या आवारात काम करणे आणि स्वतःच्या आहारासाठी भाजीपाला पिकवणे हे शालेय मुलांसाठी अनुभवात्मक शिक्षणाचे एक उत्तम उदाहरण आहे. शाळांमध्ये परसबाग निर्मितीचा हा महत्वाचा फायदा आहे. विद्यार्थ्यांना जमिनीतून बीज अंकुरणे व त्याची परिपूर्ण वाढ होणे हे पाहण्याचा / अनुभवण्याचा आनंद अतुलनीय आहे. बीजाची लागवड ते पूर्ण वाढ हया प्रकियेत विद्यार्थी जबाबदाऱ्या, सजीवांची काळजी घेणे, सामुहिक कार्य, सामाजिक कौशल्ये आणि निरोगी अन्न पर्यायांबद्दल शिकतात.


vii. Eco-Club स्थापना: इको क्लब हा शाळांमधील मुलांचा आणि शिक्षकांचा समूह आहे जो पर्यावरणीय परिस्थिती सुधारण्यासाठी योगदान देण्यासाठी कार्य करतो. परसबाग निर्मितीमुळे शाळांमधील इको-क्लब विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धन उपक्रम आणि पर्यावरर्णीय संवर्धनाचे प्रकल्प हाती घेण्यास सक्षम बनवतो.

२. परसबाग निर्मिती उदिष्टेः शालेय परसबागेची मुख्य उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत.ण्य

1. ताज्या पिकवलेल्या भाज्यांच्या सेवनाने कुपोषण आणि सूक्ष्म पोषक तत्वांची कमतरता दूर करण्यात मदत करणे.

#. मुलांना निसर्ग आणि बागकामाचा प्रत्यक्ष अनुभव देणे.

. भाज्यांच्या पौष्टिक पैलूंबद्दल आणि जंक फूडच्या हानिकारक प्रभावांबद्दल मुलांचे ज्ञान वाढवणे.

३. शालेय परसबागेची गरज आणि फायदे:-

शालेय परसबागेचे फायदे खालीलप्रमाणे आहेतः-

1. शिक्षणः परसबाग निर्मिती व विकास हे व्यावहारिक व थेट शिक्षणाचे एक चांगले उदाहरण आहे. जेथे विद्यार्थी पौष्टीक अन्न कसे उत्पादित करायचे हे शिकतात. तसेच, परसबागेतील उत्पादित भाजीपाला व फळांच्या सेवनामुळे केवळ आरोग्य सुधारत नाही तर उत्पादित भाजीपाल्यामुळे माणसास उपजिविकेची संधी मिळून तो आत्मिनिर्भर बनतो, हे जीवनातील व्यावहारिक बाजूचे शिक्षण मुलांना मिळते. शेती व फलोत्पादनातील व्यावहारिक कौशल्याव्यतिरिक्त परसबागा या पर्यावरणावियक समस्या व जीवन विज्ञानाच्या अभ्यासासाठी एक सजीव प्रयोगशाळा आहे.

ⅱ. आरोग्यः परसबाग निर्मिती मुलांच्या आरोग्यासाठी आणि शिक्षणासाठी फायदेशीर आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या शारिरीक, बौध्दिक व मानसिक क्षमतांवाढीसाठी मुलांना चांगला आहार आवश्यक आहे. परसबागेमध्ये पिकवण्यात येणाऱ्या भाजीपाला व फळांमध्ये विविध जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. सदर भाजीपाल्याचा मुलांच्या आहारातील समावेशनामुळे आहारात पौष्टिक मूल्यांची वाढ होते.

iii. पर्यावरणः परसबाग निर्मितीमुळे पर्यावरण सुधारते. शाळेच्या मैदान हे नैसर्गिक वातावरण, तयार केलेले कृत्रिम वातावरण आणि सामाजिक वातावरण या तीन घटकामध्ये विभागले जाते. माती, झाडे, कीटक आणि वन्यजीव, सूर्य प्रकाश आणि सावली, पाणी पुरवठा आणि स्वच्छता सुविधा, मार्ग, कुंपण, इमारती आणि अभ्यासासाठी ठिकाणे या बाबी सामाजिक जीवन आणि बाह्य जगाशी संपर्कासाठी मुलांना उपयुक्त ठरतात.

IV. नैसर्गिक स्वास्थ संवर्धनः सेंद्रिय बागकामामुळे मातीचे संवर्धन, पर्यावरणाचे रक्षण आणि निसर्गाशी एकरुप होऊन काम केले जाते. परसबाग निर्मिती ही अन्न पिकवण्याची एक पद्धत आहे. जमीन, सूर्य, हवा, पाऊस, वनस्पती, प्राणी आणि लोक पृथ्वीवरील नैसर्गिक संसाधनांवर अवलंबून असतात. सेंद्रिय बागेमुळे माती सुपीक आणि निरोगी राहते. कीटक आणि रोगांचे नियंत्रण होते. तसेच, सेंद्रिय पद्धती आपले जलस्रोत स्वच्छ आणि रसायनांपासून मुक्त ठेवण्यास मदत करतात.

v. निसर्गाशी जवळीक:- निसर्गाच्या जवळ असलेली मुले आनंददायी असतात. पुस्तक, शब्द किंवा पुस्तकातील विविध संकल्पना शिकण्यापलिकडे विद्यार्थ्यांना होणारा आनंद हा पर्यावरणीय शिक्षणाला दिशा आणि प्रेरणा देतो. सुरुवातीच्या काळात पर्यावरणीय शिक्षण हे आश्चर्य आणि शोधाच्या आनंदावर आधारित असले पाहिजे. परसबाग निर्मितीमुळे सदर बाब साध्य होण्यास मदत होते.

vi. विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास वाढः परसबागेव्दारे विद्यार्थी त्यांच्या पालकांना आणि समाजाला चांगले पर्यावरणीय संवर्धन करण्यासाठी प्रोत्साहन देऊ शकतात. परसबाग निर्मिती विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम किंवा अभ्यासक्रमाच्या मर्यादेपलीकडे पर्यावरणविषयक संकल्पना आणि कृती शोधण्यासाठी सक्षम करते.

४. हवामान बदलाचा परिणाम आणि शालेय परसबागांची उपयुक्ताः-

1. मानवाच्या विविध वर्तनाचा हवामानावर परिणाम होत असल्याने त्याचा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे.

ii. वनस्पती, झाडे, भाजीपाला आणि फळझाडे हवामान बदलाचे हानिकारक प्रभाव कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. जंगलतोड हे हवेची गुणवत्ता कमी होण्याचे एक प्रमुख कारण आहे. झाडे आणि इतर वनस्पर्तीच्या नाशामुळे हवामान बदल,

वाळवंटीकरण, मातीची धूप, कमी पिके, पूर येणे, वातावरणातील हरितगृह वायूंचे प्रमाण वाढणे इ. बाबी घडत आहेत.

iii. शास्त्रज्ञांच्या मते झाडे, भाजीपाला आणि फळझाडे लावणे हा हवामान संकटाचा सामना करण्याचा सर्वात मोठा आणि स्वस्त मार्ग आहे. जसजशी झाडे वाढतात तसतसे ते जागतिक उष्णता वाढीस कारणीभूत असलेले कार्बन डाय ऑक्साईडचे उत्सर्जन शोषून घेतात आणि साठवून ठेवतात. नवीन झाडे लावल्याने वातावरणातील कार्बन डाय-ऑक्साइड कमी होवून हवामान बदलाचा सामना करण्यास मदत होऊ शकते.

iv. शालेय परसबाग ही पर्यावरण संवर्धनासाठी उत्तम आहे. कारण शालेय परसबागेमुळे भाजीपाला, फळे, शेंगा आदी बाबी शाळेतच मिळत असल्याने ते अन्य ठिकाणाहून मिळवण्यासाठी लागणारा वेळ व अंतर कमी झाल्याने वातावरणातील कार्बन फुटप्रिंट कमी होण्यास मदत होते. शालेय परसबागेत आणि घराच्या आवारात झाडे, भाजीपाला आणि फळे लावल्यास वातावरणातील कार्बन जमिनीत साठवण्यास मदत होईल.

V. शालेय परसबागेत हंगामानुसार सेंद्रिय स्थानिक भाजीपाला आणि फळे लावणे शक्य आहे. त्यामुळे दुर अंतराहून वाहतूक करुन भाजीपाला आणण्यासाठी वापरण्यात येणारे इंधन व ते अन्नपदार्थ सुरक्षित ठेवण्यासाठी शीतगृहाचा वापर टाळता येतो.

vi. शालेय परसबागांमध्ये झाडे लावणे हा हवामान बदलाचे हानिकारक प्रभाव कमी करण्यासाठी एक पुढाकार असेल. योजनेंतर्गत समाविष्ट असलेल्या सुमारे ८६,००० शासकीय आणि शासकीय अनुदानित शाळांमध्ये शालेय परसबागेचा विकास केल्यास हवामानावर महत्त्वपूर्ण सकारात्मक परिणाम होऊ शकतो


५. जागा निश्चिती व आराखडा तयार करणे:-

1. परसबाग निर्मितीसाठी सपाट जमीन सर्वात सोयीस्कर आहे.

ii. परसबाग निर्मितीसाठी मुख्य घटक म्हणजे जमीनीचे याफे, पथ, रोपवाटिका, कंपोस्ट आणि बागेचे शेड हे आहे. मनरेगा योजनेतंर्गत सीमाभिंत बांधणे, जमिनीचे सपाटीकरण इत्यादी कामे करण्यात यावीत.

. उपलब्ध जागेचा विचार करुन अधिकाधिक भाजीपाला उत्पादित करण्याच्या दृष्टीने परसबागेचा आराखडा तयार करण्यात यावा.

iv. चांगला पाणीपुरवठा असल्यास पेरणीचे योग्य नियोजन करणे शक्य आहे. जर पाणी टंचाई असेल तर, पाण्याचा वापर इष्टतम करण्यासाठी जलसंधारण, ठिबक सिंचन यासारख्या उपाययोजना केल्या जाऊ शकतात.

६. कमी जागा असलेल्या ठिकाणी परसबाग निर्मितीः-

नागरी भागात आज शहरीकरणाच्या झपाट्याने बऱ्याच शाळांमध्ये भाजीपाला पिकवण्यासाठी मोकळी जागा नाही. नागरी भागातील शाळेत बाल्कनी, संरक्षण भिंतीलगत, व्हरांडा या ठिकाणी विविध उपाययोजनाव्दारे भाजीपाला निर्मिती करत्ता येते. यासाठी कंटेनरमध्ये भाजीपाला निर्मिती करणे अथवा हायड्रोपोलिक्स (Hydroponics) तंत्रज्ञानाव्दारे भाजीपाला निर्मिती करणे हे उत्तम पर्याय आहेत. कंटेनरमध्ये भाजीपाला निर्मिती करण्याचे प्रमुख फायदे खालीलप्रमाणे आहेत.

1. विद्यार्थी भाजीपाला आणि फळे कंटेनरमध्ये वाढवायला शिकतात, यामुळे भाजीपाला लागवडी यासाठी मोठ्या जमिनीची आवश्यकता नाही. ॥. टाकावू कंटेनरचा पुनर्वापर होतो.

ⅲ. सेंद्रिय कचरा जसे की स्वयंपाकघरातील टाकाऊ वस्तू आणि सडणारी कोणतीही वस्तू अशा कंटेनरमध्ये प्रक्रिया करुन कंपोस्ट तयार केले जाऊ शकते. v. कोणत्याही ठिकाणी परसबाग प्रभावीपणे तयार केली जाऊ शकते हे समजून विद्यार्थी सर्जनशील आणि चौकटीबाहेर विचार करायला शिकतील.

vi. हिरवाईमुळे शाळेची शोभा वाढेल आणि ते विद्यार्थ्यांसाठी अधिक आकर्षक ठिकाण बनेल. vii. शालेय मुलांना मर्यादित जागेचा जास्तीत जास्त वापर करून एकात्मिक बागकामाचा सराव

करण्यास सक्षम करेल,

परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

Download