राज्यातील सर्व शाळांसाठी व शिक्षकांसाठी अत्यंत महत्वाची अपडेट । निबंध स्पर्धा
निबंध स्पर्धेच्या अटी व शर्ती पुढीलप्रमाणे-*
१) ही स्पर्धा प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरांवरील शिक्षकांसाठी आहे.
२) आपले निबंध मराठी किंवा इंग्रजी या भाषेत असावेत.
३) शब्दमर्यादा कमीत कमी आठशे आणि जास्तीत जास्त बाराशे इतकी आहे.
४) हस्ताक्षरात किंवा टाईप केलेले निबंध पीडीएफ स्वरूपात खालील मेल आयडीवर पाठवावेत.
*education@chavancentre.org*
*महत्त्वाचे:-*
i) ईमेलचा विषय (Subject) या रकान्यात *शिक्षकांसाठी भव्य राज्यस्तरीय निबंध स्पर्धा २०२४* लिहावे.
ii) ईमेलच्या मजकुरात( compose email) खालील बाबींचा समावेश असावा.
स्वतःचे नाव
शाळेचे नाव
संपर्कासाठी पत्ता आणि फोन नंबर
निबंधाचे शीर्षक
निबंधाची शब्दसंख्या
५) निबंधाच्या पीडीएफ मध्ये कुठेही स्वतःचे नाव लिहू नये अथवा आपली ओळख उघड होईल असा कुठलाही मजकूर त्यात असू नये.
६) निबंध स्पर्धेचा निकाल ११ नोव्हेंबर २०२४ रोजी राष्ट्रीय शिक्षण दिनाच्या दिवशी घोषित करण्यात येईल.
७) गुणानुक्रमे दोन्ही विषयांच्या प्रत्येकी पहिल्या पाच अशा एकूण दहा निबंधांना पारितोषिक, गौरवपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन राज्यस्तरीय शिक्षण परिषदेत मान्यवरांच्या उपस्थितीत गौरविण्यात येईल.
८) नियुक्त केलेल्या परीक्षक समितीचा निर्णय स्पर्धकांना बंधनकारक राहील.
अधिक माहितीसाठी-
संजना पवार- 8291416216
*डाॅ. वसंत काळपांडे,*
मुख्य संयोजक,
शिक्षण विकास मंच,
यशवंतराव चव्हाण सेंटर.
No comments:
Post a Comment